बोल ना रे काही तरी…
शी बाबा……आज काहीच का बोलत नाहीस…
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल…
चेहरयावर हास्य मग राहिले… 


तिला कुठे माहित…
बोलक्या ओठांचा
आज अबोलाच होता…
आवाजासाठी चक्क आतुर होता… 


तीच हसन…ते लाजन…
तीच रुसन..तर कधी भांडन…
तिचे प्रश्न…तीचे उत्तर…
कधी सवांद… तर कधी वाद…
कोण होती ती….??? 


नव्हती रक्ताची… ना नात्याची….
परी होती ती या मनाची…
स्नेहच्या बंधाची…. अंतरीच्या गाभ्याची…
आठवणींनच्या काही गोड क्षणंची… 


होती ती श्रावण सर…
वाळवंटातही ओले चिम्ब करणारी…
की होती ती काजवा…
अंधार्र्या आयुष्याची… 


रेशीम गाठिंचा बंध होता…
ह्या दोन खुळ्या मनांचा…
मैत्रीचा की प्रेमाचा…
हा प्रश्न नव्हता मनांचा… 



तीच्या सोबतचा वेळ
क्षणात संपून जाई…
परत भेटीची ओढ़
आता अंतरी राहून जाई… 


मी स्वर्ग नाही पहिला…
पण तीच्या सोबतचा
प्रत्येक क्षण ......
मला स्वर्गाप्रमाणे भासला!!


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top