मी आणि ताई भांड भांड भांडायचो
नुसतेच फटके नाही ,एकमेकांना  बोच्कारायचो

सकाळी उठल्या पासून भांडण सुरु व्हायचे
एकच सायकल कुणी न्यायची इथून  युद्ध व्हायचे


चोकलेट कोणाला जास्त,संत्र कोणाच मोठ यावर पण आम्ही खूप भांडायचो
भांडा भांडीत एकमेकांच्या वस्तू तोडायचो

 मारून बोच्कारून ताई मुसुमुसु रडायची आणि मी हसायचो
आणि मग बाबान कडून धपाधप मार खायचो......


...........................आणि अचानक बाबा गेले


तूच सायकल ने ,मला जवळ जायचं आहे अस आम्ही दोघ हि म्हणायचो
किती हि उशीर झाला तरी एकमेकांची जेवायसाठी वाट पाहायचो


संत्र,चोकलेट खायची आमची परिस्थती नाही राहिली
पण पेपरमिंट ची गोळी सुद्धा ताईने माझ्या शिवाय नाही खाल्ली

ताईच लग्न ठरल ,ताईची वरात आली
मी ताईच्या गळ्यात व ताई माझ्या गळ्यात पडून ढसा ढसा रडलो


बाबा असताना हि आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो,फक्त भांडायचो
.......बाबा जाण्याने एक फरक पडला
त्यांची उणीव कमी करायचं दोघांनी हि प्रयत्न केला.......



टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top