जेव्हा कोणीच नसतं
जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....
माझं दुःख समजून प्रेमाने जवळ घेणारं ...

तेव्हा माझ्या कविता माझ्याशी बोलू लागतात,
त्याच माझ्याबरोबर हसतात, त्याच माझ्याबरोबर रडतात...

धीर देऊन सांगतात.. तू नाहीस एकटा ,
घेऊन येतात बरोबर खूप साऱ्या आठवणी.

आठवणींच्या जगात फिरताना दुःख मनातले विरून जाते,
मात्र तिथून परत येताना अंतःकरण जड होते.

वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं...
मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागतं !!!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top