तिने विचारले मला कविता कशी सुचते ?
कल्पनाच आसते ती की सत्य शब्दात गुंफते ?
मी म्हटले माहित नाही कशी ती बनते
तूच सांग मला बिज्याला हिरवे रूप कसे मिळते ?
ती म्हणाली सोप्पे आहे बिज पुरावे लागते.
ख़त पानी घालून ते रुजवावे लागते .
काल जाता काही चमत्कार तो घडतो.
बिज्याला तेव्हा हिरवा मोक्ष्य मिळतो.
मी म्हटले कवितेचे आगदी तसेच असते .
आजूबाजू ला आपल्या जे काही घडते .
कळत नकळत ते ह्रुदयात जावुन बसते .
आच्यानक मग त्याला शब्दरूप मिळते .
कळत नकळत एक काव्य बनते .
दुःख जेव्हा हृदयाला प्रमाणा बाहेर छळते.
आप्रधाचे ओझे जेव्हा मनाला सलते .
आसत आपल कोणी जे बरोबर नसते.
तेव्हा शब्द जुळतात कविता बनते .
कोणाच्या भेटीने जेव्हा आपण फुलतो.
स्वताच्याच कल्पनेत आसमंतात उडतो.
स्वप्नाच्या झुल्यात मनसोक्त झुलतो .
तेव्हा लय लागते आणि कविता जन्मते

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top